महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : दोन दिवसापुर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील आबोसींच्या राजकीय आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला धक्का दिला होता.
दोन आठवड्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश दिला होता. यानंतर आता मध्य प्रदेश ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरण आज (मंगळवारी) सुप्रीम कोर्टाने मोठा आदेश दिला आहे.
आगामी पंधरा दिवसामध्ये पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढा , असा आदेश सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला दिला आहे. यामुळे मध्य प्रदेश सरकारला देखील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. दोन आठवड्यांत पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढा. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मूदत संपली आहे. येथे निवडणुका घ्याव्यात, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेश निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सूरु करावी.आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण न करताच ओबीसी आरक्षण देणे चुकीचे आहे. ट्रीपल टेस्टपूर्वी ओबीसी राजकीय आरक्षण शक्य नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.