महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) – जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत वाढू लागली आहे. लोकसभेच्या मावळ मध्ये आता उमेदवार आपला मतदार संघ पिंजून काढताना दिसत आहेत, यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजोग वाघिरे म्हणाले, की गेल्या दहा वर्षे मावळ लोकसभेचे खासदार असतानाही त्यांना मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आणला नाही. मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. देशात कामगार कायदे बदलून त्यांना देशोधडीस लावले आहे. महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. यावरून प्रचारादरम्यान लोकांकडून प्रचंड चीड व्यक्त होते. मतदार माझ्या व महाविकास आघाडीच्या पाठिशी उभा राहणार असून आपला पावणेचार लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी बुधवारी (दि.17) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महाविकास आघाडीतर्फे आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, महिला संघटीका अनिता तुतारे, सुशीला पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, महिला शहराध्यक्ष सायली नढे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, माजी नगरसेवक मारूती भापकर, बाबू नायर, समाजवादी पक्षाचे बी डी यादव, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, दस्तगीर मणियार, गणेश दराडे याच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, येत्या मंगळवारी (दि.23) मावळ लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यावेळी युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर आणि महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मावळ लोकसभेत प्रचार करताना महायुती सरकार आणि विद्यमान खासदारांबाबत प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीला सकारात्मक प्रतिसाद देत पाठींबा मिळत आहे. त्यामुळे तब्बल पावणेचार लाख मतांनी मी विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षात मावळ मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आला नाही. मतदारसंघात एमआयडीसीचा औद्योगिक पट्टा मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून, कामगार कायदे बदलून त्यांना संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे व रायगड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न भाग, गड, किल्ले, लेण्यांचा विकास करून पर्यटनाला चालना दिली नाही. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. महागाई व बेरोजगारी त्यांना कमी करता आली नाही.
खासदारांकडून अहंकारातून उलटसुलट वक्तव्ये : संजोग वाघेरे
मी भूमिका बदलणारा कार्यकर्ता नाही : संजोग वाघेरे
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा भ्रष्टाचाराने बरबटलेली : कैलास कदम
हुकुमशाहीला नागरिक मतातून उत्तर देणार : चेतन बेंद्रे
ईडी आणि सीबीआयचा वापर करून भाजपाने देशभरात दबावतंत्र सुरू केले आहे. त्याचा वापर करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबले आहे. हुकुमशाही मोदी सरकारला नागरिक मतातून उत्तर देतील. मावळ लोकसभेत महिला व आयटी विभागाची जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत, असे आपचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.
मोदी सरकार विरुद्ध जनता अशीच निवडणूक : ज्योति निंबाळकर
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारात आणखी आघाडी घेणार: योगेश बाबर