Google Ad
Editor Choice india

आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला १५ मिनिटात बाहेर काढलं असतं : राहुल गांधी

महाराष्ट्र 14 न्यूज : काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधींनी हरियाणामध्ये बोलताना म्हटलं की, पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात, मात्र संपूर्ण देशाला माहिती आहे की चीनचं सैन्य भारतात शिरलं आहे. मग हे असे कसले देशभक्त आहेत? मी सांगतो की आमचं (काँग्रेस) सरकार असतं तर चीनला देशाबाहेर काढायला 15 मिनिटही लागले नसते. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला 100 किमी दूर केलं असतं.

जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, आपल्या देशात पाऊल टाकण्याइतकी चीनची हिंमत नव्हती. आज संपूर्ण जगात एकच देश आहे ज्या देशामध्ये दुसर्‍या देशाच्या फौजेने घुसखोरी केली आहे आणि भ्याड पंतप्रधान म्हणतात की या देशाची जमीन कोणी घेतली नाही, असा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल केला.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

187 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!