महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ एप्रिल) :
चला महापुरुषांतील जातीभेद नष्ट करू. …
शिवरायांच्या परिसरात भिमजयंती साजरी करूया हि संकल्पना मांडली. महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.ना.बच्चूभाऊ कडू(राज्यमंत्री)यांचा संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते यांना केलेल्या आव्हानांचे पालन करून प्रथम क्रांती सुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून पुस्तक भेट उपक्रम शहरात राबविण्यात आला .
यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे वसाहत येथील पंचशील विहार ,यमुनानगर येथील पंचशील विहार, अनंद नगर चिंचवड येथील, संत तुकाराम नगर येथील पंचशील विहीर, पिंपरी येथील गांधीनगर सुमेध बौध्द विहार ,अजंठा नगर येथील पंचशील बौध्द विहार व विद्यानगर येथील बौद्ध विहारास पुस्तक भेट देऊन जयंतीला सुरूवात केली तसेच १४एप्रिल रोजी एचे येथील छत्रपती शिवराय यांना पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करून शिवरायांच्या परिसरात संविधान वाचन व वृक्षरोपन करण्यात येणार आहे तसेच भक्ती शक्ती निगडी येथे तिरंग्यास सलामी देण्यात येणार आहे .
आज क्रांती जोतीराव फुले जयंतीनिमित्त उपस्थितपिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद गायकवाड , पुणे जिल्हा संघटक निरज कडू ,प्रशांत शिंदे , विशाल कांबळे,विजय ओहोळ,महादेव ढावारे,सम्राट अशोक धेंडे,सुरेश हाजारे,राहुल आखाडे,हनुमंत साळवे आदी उपस्थित होते.