Google Ad
Editor Choice Education

शाळांनी विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सौजन्यता दाखवावी … आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .०३ जुलै २०२१) : कोविड संसर्गजन्य रोगाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाला शारीरिक , मानसिक आणि आर्थिक संकटातून जावे लागत आहे . अशा प्रसंगी शाळांनी विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सौजन्यता दाखवावी असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले . महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापनाबाबत फी संदर्भात वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने आज आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

बैठकीस या शाळांचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते . त्यांच्या समवेत आयुक्त पाटील यांनी संवाद साधला , त्यावेळी ते बोलत होते . यावेळी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे , शिक्षणाधिकारी पराग मुंढे उपस्थित होते . ओरिसामधील मयुरभंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना बालमजुरीमुक्त जिल्हा करुन तेथील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचा संदर्भ देत आयुक्त पाटील यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखीत केले . शिक्षकांच्या सहकार्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपण उच्चपदापर्यंत पोहोचू शकलो असेही त्यांनी नमुद केले . आयुक्त पाटील म्हणाले , शिक्षण व्यवस्थापनाने सकारात्मक भुमिका ठेवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होते .

Google Ad

सध्या कोविड संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीतून आपण मार्गक्रमण करत आहोत , यामध्ये अनेक कुटुंब बाधित झाले आहेत , अनेकांचे रोजगार गेले आहेत , काही बालकांनी आपले पालक गमावले आहेत . अशा संवेदनशील परिस्थितीतून पुढे जात असताना लोकसेवेला अधिक महत्व देण्याची ही वेळ आहे . फी न भरल्यामुळे दाखले अथवा रिपोर्ट कार्ड न देणे , ऑनलाईन शिक्षण बंद करणे , शाळेतच वह्या पुस्तके गणवेश खरेदीची सक्ती करणे , शालेय फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकणे , आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे यांसारख्या वाढत्या तक्रारी वेदना देणा – या ठरत आहेत . आपत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारे संवेदनाहीन वागणे समाजहिताच्या दृष्टीने चांगले नाही .

विद्यार्थ्यांची अशा प्रकारे होणारी पिळवणुक सहन केली जाणार नाही . असे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त पाटील यांनी यावेळी दिला . कोरोनाने पालकांचा मृत्यू झाल्याने काही मुले अनाथ झाली आहेत . अशा मुलांना दत्तक घेवून त्यांना शिक्षण देण्यासाठी खाजगी शाळांनी पुढाकार घ्यावा .

कुटुंबाच्या सर्वांकष परिस्थितीचा विचार करुन शालेय फी मध्ये सवलत द्यावी , आपत्कालीन परिस्थितीत सौजन्यता दाखवून किमान १५ टक्के फी कमी करावी , आरटीई अंतर्गत असलेले प्रवेश तात्काळ द्यावेत , पालकांशी संवाद साधून शालेय फी बाबत निर्णय घ्यावा , विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते वृध्दींगत करण्यासाठी वृक्षारोपण मोहिम राबवावी.

कोरोनाच्या संभाव्य तिस – या लाटेमध्ये जनजागृती करण्यासाठी अचूक आणि योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी , अशा सुचना आयुक्त पाटील यांनी बैठकीत केल्या . काही व्यक्ती शाळेला हेतुपुर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने कृत्य करत असतील तर अशा वेळी महापालिका प्रशासनाचे सहकार्य शाळा व्यवस्थापनाला असेल , असे ते म्हणाले . पिंपरी चिंचवड शहराचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

23 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!