Google Ad
Editor Choice

मोठी बातमी : राज्यातील या महापालिका क्षेत्रांमध्ये दुकानांच्या वेळा वाढविण्यास मुभा 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०मे) : राज्य सरकारने लाॅकडाऊन हा 15 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी आता काही ठिकाणी लाॅकडाऊन शिथिल करण्यास सुरवात झाली आहे. `ब्रेक दि चेन`चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून ठरविण्यात येणार आहेत.

त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. यासाठी दोन प्रमुख निकष ठरविण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेला पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

Google Ad

या दोन निकषांनुसार बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक महापालिका क्षेत्रांमध्ये दुकानांच्या वेळा वाढविण्यास मुभा देण्यात आली आहे. या सर्व महापालिकांत पाॅझिटिव्हिटी दर हा दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि तेथील आॅक्सिजनच्या खाटावरील रुग्णही कमी झाले आहेत.
त्यामुळे या पालिका क्षेत्रांतील सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!