महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० मे) : मोदी सरकराला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं मुंबईसह राज्यात आंदोलन केलं. पण या आंदोलनात करोना नियमांचा पूर्ण फज्जा उडाला असुन अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. कोविड संसर्गा रोखण्यासाठी आखलेले नियम सत्ताधारी पक्षाकडुन मोडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाला एक न्याय आणि जनसामान्यांना व विरोधी पक्षातील नेत्यांना दुसरा न्याय, सरकार कसा लावू शकते ?
मी आंदोलन केले तर माझ्यावर कारवाई केली, गुन्हे नोंदवले तशी कारवाई मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांवर लावण्याची हिम्मत दाखवणार का, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
प्रवीण दरेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवरून राज्यसरकार वर ह्ल्लाबोल केला. संजय राऊत आणि शिवसेना यांना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विसर पडला आहे. त्यांना सध्या फक्त काँग्रेस आणि जवाहर लाल नेहरू यांची पुण्याई आठवते. केंद्रातील भाजप सरकारच्या 7 व्या वर्षपूर्तीनिमित्त कॉग्रेस पक्षांने केलेल्या आंदोलनाला लोकांनी प्रतिसादच दिला नाही, अशी जहरी टीका प्रवीण दरेकर यांनी केली..
103 Comments