Google Ad
Editor Choice

Baramati : वसुली करायला बसलोय का ? … नको ती कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोखठोक अंदाज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जुलै) : राज्यात 100 कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागल्यानंतर ‘वसुली’ प्रकरणाची राज्यासह देशभरातही चांगली चर्चा रंगली.

या प्रकरणात पोलिस निरीक्षकासह बरेच जण गोत्यातही आले आहेत. अडकलेले पैसे अडकल्याचा व ते मिळवून देण्याची दाद मागणाऱ्या एका नागरिकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास रोखठोक शैलीत हटकण्याचा प्रकार बारामती येथील जनता दरबारात घडला. एका ठिकाणी पैसे अडकले असल्याची तक्रार घेऊन येणाऱ्यास पवारांनी ‘मी काय वसुली करायला बसलोय् का?’ असा थेट सवालच केला.

Google Ad

जनता दरबारात अजित दादा बारामतीमधील लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करत असतात. एका बहाद्दराने त्यांच्याकडे चक्क एका व्यक्तीकडे अडकलेले पैसे वसुली करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली, ज्याचा त्यांनी नंतर चांगलाच समाचार घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!