महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
लोकशाहीमध्ये ताकद आहे हे कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं आहे. अस जयश्री जाधव यावेळी बोलताना म्हणाल्या… तसेच यापुढे जनतेची सेवा करत अण्णांचे स्वप्न साकार करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात मोठी चुरस होती. १५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये जयश्री जाधव यांनी१८ हजारांहून अधिक मतांनी बाजी मारली.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे या निवडणूकीत जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम हे उमेदवार असले तरी ती प्रत्यक्षात काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील विरुध्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई म्हणूनच पाहिले गेले.या सगळ्याचे किंगमेकर म्हणून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे नांव ठळक झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातही आता त्यांचे वजन वाढणर आहे.