Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Kalyan : मित्राची हत्या करुन क्राईम ब्रांच ऑफिससमोर पानटपरी टाकली , पोलिसांनी शिताफीने छडा लावला

महाराष्ट्र 14 न्यूज : पैसे चोरी केल्याच्या संशयावरुन पान टपरी चालकाने आपल्या साथीदाराची हत्या केली. ही घटना कल्याण येथे घडली. मित्राने मित्राची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुनील पटेल असं आरोपीचे नाव आहे. तर सूरज पाल असं मृताचे नाव आहे . आरोपी आणि मयत हे दोघे उत्तर प्रदेश येथील बांदा जिल्हा येथे राहणारे आहेत. 21 ऑगस्टच्या रात्री पैसे चोरीच्या संशयावरून सुनीलने सूरजला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. त्यांचा मृतदेह कल्याण शीळ रोड वरील क्लासिक हॉटेलच्या बाजूला असलेल्या तलावात फेकून दिला.

सुनीलने सूरजची हत्या केल्यानंतर परिसरातच या घटनेची माहिती पसरली. या हत्येची कुणकुण कल्याण क्राईम ब्रांचला लागली. त्यानंतर त्यानी या हत्येचा शोध घेण्यास सुरुवात केली. क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने या प्रकरणी सखोल तपास करून मयत सूरज चा मृतदेह शोधून काढला आणि हत्येचा आरोपी सुनील पटेलला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात नसताना क्राईम ब्रांचने या हत्येचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

Google Ad

हत्येनंतर चार दिवसांपासून सूरज बेपत्ता आहे. मात्र कुणी शोध घेत नाही. सुनीलने सुरजचा खून केला आहे ही चर्चा विभागात पसरली होती. कल्याण क्राईम ब्रांचने जेव्हा सुनीलला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा हा प्रकार समोर आला. सुनील हा कल्याण क्राईम ब्रांच कार्यालयसमोर अनेक वर्षांपासून पान टपरी चालवतो.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!