महाराष्ट्र 14 न्यूज : देशात घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील संबंध कायदेशीररीत्या परिभाषित करण्याच्या सध्याच्या प्रणालीमध्ये अनेक त्रुटी असल्याचं समोर आलंय. ही तफावत दूर करण्यासाठी देशातील भाडे मालमत्ता बाजारात नियमितता आणणे, भाडे मालमत्तांची उपलब्धता वाढविणे, भाडेकरू आणि घर मालकांचे हित जोपासणे, भाडे मालमत्तेच्या विवादांचे कोर्टावरील ओझे कमी करणे. तसेच त्वरेने तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने हा नवीन कायदा आणलाय. या कायद्याचा एक उद्देश भाड्याने मिळणार्या मालमत्तेचा व्यवसायात पारदर्शकता आणणेदेखील आहे. त्यातील तरतुदी काय आहेत हे जाणून घ्या.
या कायद्यात जिल्हास्तरावर ‘भाडे प्राधिकरण’ स्थापन करण्याची तरतूद
भाडेतत्त्वावर मालमत्ता देण्याचे नियमन करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘भाडे प्राधिकरण’ स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात आहे. रिअल इस्टेट मार्केटचे नियमन करणार्या रेराच्या धर्तीवर हा कायदा तयार करण्यात आलाय. ‘भाडे प्राधिकरण’ तयार झाल्यानंतर जेव्हा जेव्हा कोणत्याही घराचा मालक आणि भाडेकरू घर भाड्याने देण्याचे करार करतात, तेव्हा त्यांना या अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल. करारावर स्वाक्षरी होण्याच्या तारखेपासून दोन महिन्यांत दोन्ही पक्षांना भाडे अधिकार्यास कळवावे लागेल. अशा प्रकारे हा कायदा घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी कार्य करेल. इतकेच नाही तर हा कायदा भाडे कराराशी संबंधित डेटादेखील आपल्या वेबसाईटवर ठेवेल.
नव्या कायद्यात वाद झाल्यास त्वरित तोडगा काढण्याची तरतूद
नवीन कायद्यात घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाल्यास त्वरित तोडगा काढण्याची तरतूद केलीय. वादाच्या बाबतीत कोणताही पक्ष प्रथम भाडे प्राधिकरणाकडे जाऊ शकतो. भाडे-प्राधिकरणाच्या निर्णयावर कोणताही एक पक्ष नाराज असेल, तर तो भाडे न्यायालयात किंवा न्यायाधिकरणाकडे तोडग्यासाठी अपील करू शकतो. यासाठी प्रत्येक राज्यात भाडे न्यायाधिकरण स्थापन केले जातील. भाडेकरू आणि घर मालक यांच्यातील वादाचे प्रकरण बर्याच वर्षांपासून सुरू आहे. नवीन भाडेकरू कायदा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा प्रदान करतो. कायद्यात ज्या भाड्याने दिलेली कोर्ट किंवा न्यायाधिकरणाविषयी चर्चा झाली आहे, त्यांना सुनावणीनंतर 60 दिवसांच्या आत या प्रकरणाचा निर्णय घ्यावा लागेल. इतकेच नाही, तर भाडेकरू किंवा न्यायाधिकरण स्थापन झाल्यानंतर अशी प्रकरणे दिवाणी कोर्टाच्या अखत्यारीत येतील, असे कायद्याने स्पष्ट केले. म्हणजेच आता हा वाद मिटविणे 60 दिवसांत शक्य होईल.
घर मालकांना भाडेकरू घर ताब्यात घेण्याच्या भीतीने मुक्त करेल
नवीन भाडेकरूंचा कायदा घर मालकांना भाडेकरू घर ताब्यात घेण्याच्या भीतीने मुक्त करेल. कायद्यानुसार तरतूद आहे की, जर घर मालकाने करारानुसार भाडेकरूस आगाऊ सूचना दिली, तर करार संपल्यास भाडेकरूंना जागा रिकामी करावी लागेल. अन्यथा घर मालक पुढील दोन महिन्यांसाठी भाडे दुप्पट आणि त्यानंतर त्यापेक्षा चार पट वाढवू शकतो. भाडेकरू कायद्यात घरमालकांना आणखी एक संरक्षक देण्यात आलंय. भाडेकरूंनी सलग दोन महिने भाडे न भरल्यास घरमालकास जागा रिक्त करण्यासाठी भाडे न्यायालयात जावे लागेल. एवढेच नव्हे तर कायद्याने भाडेकरूंना घर मालकाच्या परवानगीशिवाय दुसर्या व्यक्तीस भाग किंवा इतर सर्व मालमत्ता देण्यास मनाई केली आहे.
दोघांमधील वादांचे मुख्य कारण म्हणजे डिपॉझिटची रक्कम
घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादांचे मुख्य कारण म्हणजे डिपॉझिटची रक्कम आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत भाडेकरूंच्या रकमेचीही पूर्ण काळजी घेण्यात आलीय. कायद्याने भाड्याने मिळणार्या मालमत्तेसंदर्भात सुरक्षा ठेवीची कमाल मर्यादा निश्चित केली गेलीय. सध्या शहरांनुसार ती भिन्न आहे. दिल्लीत हे एका महिन्याचे अतिरिक्त भाडे असेल, तर बंगळुरूमध्ये तीन ते सहा महिन्यांचे आगाऊ भाडे घेतले जाते. परंतु नव्या कायद्यात हे स्पष्ट करण्यात आले आहे की, निवासी मालमत्तेसाठी जास्तीत जास्त भाडे सुरक्षा दोन महिन्यांची ठेव असू शकते आणि अनिवासी मालमत्तेसाठी जास्तीत जास्त भाडे सुरक्षा ठेव सहा महिन्यांची असू शकते.
केंद्र सरकारचा हा कायदा एक आदर्श अधिनियम आहे
केंद्र सरकारचा हा कायदा एक आदर्श अधिनियम आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम राज्य सरकारांचे आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने या कायद्यास मान्यता दिलीय. आता हे राज्यांच्या अधिकारात आहे की, ते कोणत्या स्वरूपात त्याची अंमलबजावणी करतात. केंद्रशासित प्रदेश चंदीगडसारख्या काही ठिकाणी या अंमलबजावणीचे काम सुरू झालीय. या कायद्याच्या अंमलबजावणीचे काम फार पूर्वीपासून सुरू झालेय. परंतु निश्चितपणे हा कायदा राज्यातील भाडेकरु कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक घटक म्हणून काम करेल.
5 Comments