महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२४ सप्टेंबर) : राज्यात नवे सरकार स्थापन झाले खरे, पण जवळपास तीन महिने होत आले तरी पालकमंत्रीपदाची नेमणूक करण्यात आली नव्हती. अखेर राज्य सरकारला मुहूर्त सापडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून गिरीश महाजन यांची धुळे, लातूर, नांदेडवर बोळवण करण्यात आली आहे.पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील – पुणे
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे – सांगली
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार – हिंगोली
दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर