Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : पोलीस भरतीत राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देणार … गृहमंत्री अनिल देशमुख

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यसरकार पोलीस विभागात मोठी भरती करणार आहे. दरम्यान मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यात पोलीस विभागातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार विनायक मेटे यांनी पोलीस मेगा भरतीत मराठा समाजाच्या 13% जागा रिक्त ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा आणि मग भरती करावी, या मागणीसाठी आमदार विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज भेट घेतली. याबाबत गृहमंत्री देशमुख सकारात्मक आहेत, असं मेटे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय राज्य सरकार देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!