महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. या अनुषंगानं जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या जास्त आहे. त्यात ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. यामुळे जात पडताळणी अर्जसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
आज (29 डिसेंबर) व उद्या (30 डिसेंबर) या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेनुसार पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल आणि खिडकी वाढणवण्यात यावी. कार्यालय पूर्ण वेळ तसेच सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावेत, अशा सूचना देखील जात पडताळणी समित्यांना देण्यात आल्या आहेत.
51 Comments