महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या आठवड्यात मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण ५८ टक्के भरले आहे . मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी वाढत आहे . लोणावळ्यात २४ तासांत १५७ मिमी पावसाची नोंद झाली असून , या वर्षी आजअखेरपर्यंत केवळ २५१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे .
गत वर्षी सुमारे ४९८३ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात २५ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ५८.८३ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा ९५.८० टक्के झाला होता . यासह लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पुन्हा पाणी ओसंडून वाहू लागले आहे . मावळातील नद्या , ओढे नाले ओसंडून वाहत आहेत .
पवन मावळातील थुगाव येथील पवना नदीवरील दोन खांब ढासळून गेले आहेत, तेव्हा तो पूल केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे पूल दुरुस्तीची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
15 Comments