Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Pimpri : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑनलाईन प्रबोधन पर्व, वेबिनार कार्यक्रमाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०१ ऑगस्ट) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे . सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून सोशल मिडीयाद्वारे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सुरक्षित अंतर ठेऊन कामकाज करायचे आहे . असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीआज व्यक्त केले . निगडी येथील सावरकर भवन येथे दिनांक १ ते ५ ऑगस्ट २०२० दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑनलाईन प्रबोधन पर्व वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

त्याचे उदघाटन त्यांचे हस्ते झाले त्या वेळी त्या बोलत होत्या . यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , नगरसदस्या अनुराधा गोरखे , कमल घोलप , अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे , सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण , कार्याध्यक्ष नितीन घोलप , पदाधिकारी विशाल कसबे , सचिन पारवे , सुनील भिसे

Google Ad

गणेश खण्डाळे , संदीपान झोम्बाडे , भाऊसाहेब अडागळे , मनोज तोरलमल , नाना सरोदे , माजी नगरसदस्य प्रल्हाद सुधारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते . यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या महानगर पालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य घराघरात पोहचणे गरजेचे आहे . त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे त्यामुळे या वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . अण्णाभाऊंचे विचार आपल्याला खूप उंचावर न्यायचे असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना घरबसल्या होणार असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी असेही त्या म्हणाल्या .

पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपल्या भाषणात कोरोनाचे सावट संपूर्ण देशात तसेच पिपरी चिंचवड शहरात देखील आहे . आणि आण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहत्सव पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आणाभाऊंचे विचार समजापर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ५ दिवसाच्या वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे . आण्णाभाऊ साठे यांची जागतिक साहित्यिक म्हणून ओळख आहे . त्यांचे विचार या माध्यमातून घराघरात पोहचणार आहेत . त्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

51 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!