महाराष्ट्र 14 न्यूज : दुचाकीवर विना हॅल्मेट किंवा लोकल हॅल्मेट घालून प्रवास करताना आढळल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे केंद्र सरकारच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या नव्या मापदंडांनुसार हेल्मेटचे वजन दीड किलोवरू घटवून एक किलो २०० ग्रॅम करण्यात आले आहे. दरम्यान, गैर बीआयएस मानांकित हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्री हा गुन्हा मानला जाईल. असे करणाऱ्या कंपनीला दोन लाखांपर्यंत दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते.
तसेच अशा लोकल हॅल्मेटची आता निर्यात करता येणार नाही. बीएसआय लागू झाल्याने हॅल्मेटचा बॅच, ब्रँड आणि उत्पादनाची तारीख ग्राहकांना कळणार आहे. या नवीन नियमांची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. काही दिवसांनी त्याची अंमलबजावणी होऊ शकते. यामध्ये राज्य सरकारच्या प्रवर्तन विभागाला लोकल हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे अधिकार असतील.
19 Comments