Google Ad
Editor Choice Maharashtra

A.Nagar : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून … क्षुल्लक कारणावरून घाटात झाला हल्ला!

महाराष्ट्र 14 न्यूज : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नगर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Google Ad

रेखा जरे कुटुंबियांसह आज संध्याकाळी पुण्याहून काम उरकून नगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा, सून, त्यांची आई देखील होते. या दरम्यान कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. या वादातून रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली.

पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला .

गाडीला कट मारल्याचा कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!