महाराष्ट्र 14 मे, (दि.२० मे) : दि. 20 मे 2022 रोजी पुणे जिल्ह्यातील समस्या जाणुन घेण्यासाठी काँग्रेस भवन येथे जनता दरबार भरविण्यात आला होता. पुण्यातील काँग्रेस भवन येथे संपर्क मंत्री म्हणुन मा. सुनिलजी केदार (Cabinet Minister Maharashtra state and Minister of Husbandry,Dairy Development,Sports & Youth Welfare Government of Maharashtra. ) आले होते.
खेड तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. गणेश कोंडीभाऊ सहाणे यांनी मंत्री महोदयांसमोर काही कंपण्याकडुन बोगस बियाने बाजारात विकुन शेतकरी बांधवांची फसवणुक होत अाहे असे निदर्शनास आणुन दिले आहे.
तसेच पावसाळ्याच्या तोंडावर बाजरी , भुयमुग व सोयाबीन ची पेरणी केली जाते , या वेळेस खतांचा पुरवठ्यात तुटवडा जानवतो किंवा तुटवडा निर्माण केला जातो. यामध्ये सुध्दा शेतकरी बांधवांकडुन जास्तीचे पैसे आकारुन लुट केली जाते. शेतकरी बांधवांची बोगस बी- बियानांपासुन होणारी फसवनुक थांबावी अशी उपाययोजना करण्याची मागणी अॅड. गणेश कोंडीभाऊ सहाणे यांनी मंत्री महोदयांसमोर केली आहे