महाराष्ट्र 14 न्यूज : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवी सांगवीतील साई चौक येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोणताही भारतीय हा दिवस विसरू शकत नाही. दोन वर्ष अगोदर आजच्याच दिवशी पुलवामा हल्ला झाला होता. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो, जे या हल्ल्यात शहीद झाले होते. आम्हाला आपल्या जवानांचा अभिमान आहे, त्यांच्या शौर्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.’ अशा शब्दांमध्ये माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पुलवामामधील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी नगरसेवक नवनाथ जगताप, माजी नगरसेवक अतुल शितोळे , माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, श्याम जगताप, शिवाजी पाडुळे, सुरेश सकट, तानाजी ( पिंटू ) जवळकर, अमरसिंग अदियाल, राहुल काकडे, निखिल चव्हाण, संयुक्त जयंती चे अध्यक्ष कांता भाऊ कांबळे,. रवींद्र पारधी सर , ॲडव्होकेट नितनवरे सर, नयना अहिरे हरीश भाऊ गायकवाड व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
72 Comments