Google Ad
Editor Choice Pune District

Shirur : हाथरस घटना … अण्णा हजारे यांनी केला निषेध , फाशी देण्याची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : उत्तर प्रदेशातल्या हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निषेध केला आहे . या नराधमांना फाशी देण्यात आली पाहिजे , असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे . असं दुष्कृत्य म्हणजे  समाजाला लागलेला कलंक असून मानवतेची हत्या झाल्याची टीका त्यांनी केली . अशी दुष्कृत्य रोखण्यात देशाची सुरक्षा व्यवस्था कमी पडत असल्याची टीका त्यांनी केली आहे . उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काही नराधमांनी एका मुलीसोबत दुष्यकृत्य केले आहे . हा मानवतेवरील कलंक आहे . ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे .

भारत हा ऋषीमुनींचा देश म्हटला जातो . भारताची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे . अशा देशात लाजेने मान खाली घालावी लागणारे दुष्कृत्य होणे हे योग्य नाही , अण्णा हजारे म्हणाले. आणखी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था , सांभाळायची , ते लोक यात कमी पडत आहेत . ही गोष्ट देशासाठी चिंताजनक आहे . असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून अशा नराधमांना फाशी देणे आवश्यक आहे , असे हजारे यांनी म्हटले आहे .

Google Ad

तर देशभर आंदोलन दरम्यान , हाथरस येथील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी , या मागणीसाठी जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय चर्मकार संघ आणि सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले . फाशी दिली नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला . हाथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!