Google Ad
Editor Choice Maharashtra

A. Nagar : शेतकऱ्यांना मिळणार दिलासा .. रात्रीऐवजी दिवसा मिळणार वीज – राज्यमंत्री तनपुरे

महाराष्ट्र 14 न्यूज : शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी सध्या रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा होत आहे. मात्र आता शेतकऱ्यांकडून दिवसा वीज पुरवठा मिळावा अशी मागणी होत आहे. त्या मागणीचा विचार करता पुढील तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले असून त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.ते अहमदनगर मध्ये बोलत होते.

पुढे बोलताना तनपुरे म्हणाले शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार ठीकठिकाणी २ ते १० मेगावँट पर्यंतचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे असे तनपुरे यांनी सांगितले आहे. राज्यात सद्यस्थिती मध्ये ६८ फिडर उभारण्यात आले असून २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे असे ही तनपुरे यांनी सांगितले.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!