महाराष्ट्र 14 न्यूज : माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी आता एल्गार परिषदेची नवी तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्याचा मानस बी.जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असे बी.जी. कोळसे-पाटील यांनी सांगितले. हे सरकार मनुवादी विचारांनी ग्रासले आहे. सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी आणि पाणी नवं आहे, अशी टीका बी.जी. कोळसे-पाटील यांनी केली.
लोकांनी एल्गार परिषदेचा हेतू समजून घेतला पाहिजे. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव दंगलीचा काही संबध नाही. आम्हाला ऑनलाईन परिषद घ्यायला सांगता. तुम्ही मात्र सभा घेता. एल्गार परिषदेचा तपास खोटा असल्याचा दावाही यावेळी बी.जी. कोळसे-पाटील यांनी केला. यापूर्वी पुणे पोलिसांनी 31 डिसेंबरच्या नियोजित एल्गार परिषदेला परवानगी नाकारली होती. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे (नाईट कर्फ्यू) कारण देत स्वारगेट पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले होते.
16 Comments