महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या १३ महापालिका कर्मचा-यांच्या वारसांना महापालिकेकडून प्रत्येकी २५ लाख रुपये सुरक्षा कवच योजनेअंतर्गत देण्यात आले.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी कार्यरत असलेल्या महापालिकेच्या २३ कर्मचा-यांचा कोरोना बाधित होऊन मृत्यू झाला. यातील १३ कर्मचा-यांच्या वारसांना विमा योजनेनुसार २५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले.
मृत पावलेल्या कर्मचा-यांमध्ये अनंत काळबांटे, हनुमंत वाडेकर, मारुती शेडगे (मजूर), शोभा भुजबळ (स्टाफनर्स), ज्ञानेशर जाधव (वॉर्डबॉय), भालचंद्र राऊत (एमपीडब्लू), मोहम्मद शेख (लिफ्टमन), सिध्दार्थ जगताप (उपलेखापाल), तानाजी धुमाळ, तायप्पा बहिरवाडे (रखवालदार), संभाजी पवार (शिपाई), अनिल ठाकूर (क्लिनर), साईनाथ लाखे (कार्यालयीन अधिक्षक) यांचा समावेश आहे. यांच्या वारसांना विमा रकमेचा धनादेश महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेवक शशिकांत कदम, अभिषेक बारणे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, बाळासाहेब कापसे, कामगार कल्याण विभागाच्या माया वाकडे उपस्थित होते.
4 Comments