महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना पावसाळयामुळे जिल्हयातील नागरी तसेच ग्रामीण भागात डासांची सुध्दा मोठया प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. यामुळे मलेरीया, डेंग्यु अशा साथीच्या रोगांची लागण जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच नागरिक कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना साथीच्या रोगांचे नवे संकट उदभवल्यास नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात पावसाळयामुळे डासांची उत्पत्ती होवू नये, डबके साचुन राहू नये यादृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली आहे. यासंदर्भात जनजागरणाच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी फलक लावणे, फवारणी करणे व तत्सम उपाययोजना सुध्दा तातडीने हाती घेण्यात आल्या पाहिजेत.स्वच्छता मोहीम राबविताना नगरसेवक व संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजेत असेही श्री प्रशांत भाऊ येळवंडे यांनी सांगितलं
9 Comments