Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार … किरीट सोमय्या यांनी वर्तवलं भाकीत

महाराष्ट्र 14 न्यूज : ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार, असं भाकित भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी वर्तवलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीनप्रकरणी घरी बसणार, असंही ते म्हणाले .

किरीट सोमय्या हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आज ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आले होते. अजूनपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. त्यांना अटक का होत नाही, असेही त्यांनी विचारले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे देखील उपस्थित होते.

Google Ad

टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख त्या चॅनेलवाल्यांना का घाबरत आहेत. एफआयआरमध्ये दुसरेच नाव आहे. तसेच, ठाकरे सरकार आल्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये टाकण्याची का धडपड करत आहेत, तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एसआरए प्रकरणात खोटे बोलत आहे. तर, याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका टाकणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!