महाराष्ट्र 14 न्यूज : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक राहिली आहेत. अख्ख्या देशाचं या निवडणुकीकडे लक्ष आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 8 वाजता सुरु झाली . त्यामुळे, बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाविषयी सामनामधून राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. बिहार निवडणुकीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है…..
असे असेल निकालाचा वेळ :-
विजय आणि पराभवाचा कल सकाळी 10 वाजताच्या आसपास मिळू शकतो. मागील निवडणुकीतही असेच घडले आहे. कोणता उमेदवार पुढे आहे आणि कोण मागे आहे याचा कल सकाळी 10 नंतरच समोर येईल.
कोणता पक्ष जिंकतोय की पराभूत होतोय हे सर्व जागांचे ट्रेंड सकाळी उघड होतील. कोणता पक्ष कोणत्या ठिकाणी आघाडी घेत आहे आणि कोण मागे आहे, याबद्दल निवडणूक आयोग अधिकृत माहिती देईल.
बिहारमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल हे मंगळवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. कधी कधी दुसर्या दिवसापर्यंत मतमोजणी सुरूच राहिली आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल दिवसभरात जाहीर होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2
014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
राजद – 80
काँग्रेस – 27
जदयू – 71
भाजप – 53
लोजप – 2
रालोसप – 2
हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
एकूण जागा – 243
12 Comments