महाराष्ट्र 14 न्यूज : सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे विभागाला पाठवलं होतं. रेल्वेकडून या पत्राचं उत्तर देण्यात आलं आहे. सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिवाय रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
सर्वांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी प्रवासाची रुपरेखा ठरवावी लागणार असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सरकारने प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल लोकल चालवण्यास सांगितले आहे. मात्र आधीपासून सर्व लेडीज स्पेशल लोकल सुरू आहेत.
तसेच प्रत्येक लोकलमध्ये 23 टक्के जागा लेडीज प्रवाशांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास स्टेशनवर महिला प्रवासी वाट बघत उभे राहतील, तसेच पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या कमी होतील, यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असं पश्चिम आणि मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
57 Comments