महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि कोरोनावरील लस आल्याने या नियमामध्ये सूट देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही. परंतु गाडीतील प्रवासी हे कुटुंबातील असले पाहिजेत. ही सवलत फक्त खासगी वाहनांना असणार असल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.
चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही . कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनातून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात, असे महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क घालणे बंधनकरक करण्यात आले होते. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पिंपरी चिंचवड मधील कोरोना नियंत्रणात आला असून वाहन चालवताना मास्कची गरज नाही. ही सवलत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये फक्त खासगी वाहनांनाच देण्यात आली आहे.
![Google Ad](https://maharashtra14news.com/wp-content/uploads/2023/10/photo_2023-10-18_23-28-39-1.jpg)
148 Comments