महाराष्ट्र 14 न्यूज : बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना त्यांची ओळख झाली आणि काही कालावधीतच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघानींही लग्नाच्या आणाभाका घेतल्या मात्र त्यावेळी काही कारणाने त्याचे लग्न होऊ शकले नाही. सदर तरुणाने घरच्यांच्या सांगणावरून दुसऱ्या एका मुलीशी लग्न केले आणि त्याचा सुखाचा संसार सुरु झाला मात्र त्या तरुणाला तिला विसरणे काही शक्य होत नव्हते.लग्न झाल्यानंतर देखील त्याचे चोरून लपून तिला भेटणे सुरूच होते अखेर त्याने पुन्हा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शहरात हडपसर भागात ही घटना घडली आहे .
उपलब्ध माहितीनुसार ,मयत अपर्णा महाडिक ( वय ३६. रा. सहारा कॉर्नर ) आणि सुरेंद्र प्रकाश साळुंके ( वय ४२. रा. हडपसर ) हे काही वर्षांपूर्वी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले मात्र काही अडचणीमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही . सुरेंद्रने दुसऱ्या एका मुलीशी लग्न केले आणि त्यांचा संसार सुरु झाला मात्र लग्न होऊन देखील सुरेंद्र आणि अपर्णा यांना एकमेकांची ओढ लागून राहिलेली होती त्यामुळे सुरेंद्रने मागचा पुढचा विचार न करता अपर्णा हिच्याशी दुसरे लग्न केले आणि दुसरीकडे घर घेऊन आणखी एक संसार सुरु झाला. सुरेंद्र यास पहिल्या बायकोपासून चार मुले आहेत .
सुरेंद्र आणि अपर्णाचा संसार सुरु झाला खरा मात्र त्यांच्यात रोज किरकोळ कारणावरून खटके उडू लागले. असेच एकदा भांडण झाले असताना त्याने रागाच्या भरात आधीची प्रेयसी आणि दुसरी पत्नी असलेल्या अपर्णा हिचा जोराने गळा आवळला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याचे पाहताच सुरेंद्र घाबरला आणि घरातून निघून गेला.
दरम्यान शेजार्यांना ह्या गोष्टीची थोडीशी कल्पना आल्याने त्यांनी पोलिसांना फोन केला. वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि ही खुनाची घटना घडल्याचे उघडकीस आले. आरोपी सुरेंद्र याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आणि काही काळातच आरोपीस पकडण्यास यश आले.
20 Comments