Google Ad
Editor Choice Maharashtra

Delhi : इन्कम टॅक्समध्ये झाला ‘ असा ‘ बदल … वाचा , कुणाला किती भरावा लागणार टॅक्स!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करीत आहेत. 2021 टॅब्लेटद्वारे बजेट सादर केले जाते. शेतकरी, कामगार ते सामान्य करदात्यांपासून तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटवर आहे.

अर्थमंत्री सीतारमण या आज वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये चालू आर्थिक वर्षाचा सरकारचा महसूल आणि खर्च याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. खरंतर, अनेक लोक अर्थसंकल्पाच्या प्रतिक्षेत असता. कारण, याचा टॅक्सवर मोठा परिणाम होतो.

Google Ad

🔴इन्कम टॅक्सविषयी सविस्तर माहिती :-

गेल्या वर्षीच्या नव्या पर्यायी व्यवस्थेत चार ते पाच टॅक्स स्लॅब आहेत.

5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर पूर्वी 20% कर भरावा लागायचा. आता त्यात कपात करून तो 10% करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे 7.5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर पूर्वी 20% दराने कर भरावा लागायचा. तो आता 15% दराने द्यावा लागत आहे.

10 ते 15 लाख रुपयांच्या स्लॅबवर पूर्वी 30% कर भरावा लागायचा. आता त्याचेही दोन भाग करण्यात आले आहेत – 10 ते 12.5 लाख रुपयाच्या उत्पन्नावर 20% तर 12.5 ते 15 लाख पर्यंतच्या स्लॅबसाठी 25% दराने कर भरावा लागत आहे.15 लाख रुपयांच्या वर उत्पन्न असेल तर पूर्वीही 30 टक्के दराने इनकम टॅक्स भरावा लागायचा. आताही त्याच दराने कर भरावा लागत आहे.

या सर्वांसाठी काही अटी घालून दिल्या आहेत. अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्वी करमुक्त होतं. आता हा स्लॅब पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

134 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!