महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकार विविध योजना आणत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जात आहे. पण आता सरकार शेतकऱ्यांना आणखी 5 हजार रुपये देण्याची तयारी करत आहे. हे पैसे शेतीसाठी लागणाऱ्या खतं आणि औषधांसाठी देण्यात येणार आहेत. सध्या सरकार विविध खतं तयार करणाऱ्या कंपन्यांना सबसिडी देत आहे. परंतु आता सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा विचार करत आहे.
सीएसीपीने ने ही सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. या आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना 2,500 रुपयांच्या दोन हफ्त्यांमध्ये ही रक्कम देण्यात यावी. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पहिला हफ्ता आणि रब्बीच्या हंगामाला सुरुवातीआधी दुसरा हफ्ता देण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे. सध्या कंपन्यांना सबसिडी दिल्याने यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले आहे. तसेच खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना ब्लॅकमध्ये खतं आणि औषधे विकत घ्यावी लागतात
9 Comments