महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गुरुवारी एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ गुरुवारी झाली आहे. २४ तासांत २५ हजार ८३३ नागरिकांना कोरोनाची लागण झली आहे. राज्यातील मृतांचा आकडा हा ५८ वर पोहोचला आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी नंदुरबारमध्ये असताना पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. लॉकडाऊन हा एक पर्याय मला दिसत आहे. मात्र, अजूनही मला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आता लोकं मास वापरु लागले आहेत, असेही ते म्हणाले.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचेच आहेत हे सांगताना येणार उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, व उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारावी, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांशी कॉन्फरन्सद्वारे लसीकरण संदर्भात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
3 Comments