महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या पंधरा दिवसांत मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण ७८.८७ टक्के भरले आहे . मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्याही पाण्याची पातळी वाढत आहे . गेल्या २४ तासांत २३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी आजपर्यंत सुमारे ३,१२१ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात २३ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ७८.८७ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा ९९.७० टक्के झाला होता . यासह लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पुन्हा पाणी ओसंडून वाहू लागले आहे . मावळातील नद्या , ओढे नाले ओसंडून वाहत आहेत .
पवन मावळातील थुगाव येथील पवना नदीवरील दोन खांब ढासळून गेले आहेत, तेव्हा तो पूल केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे पूल दुरुस्तीची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
6 Comments