महाराष्ट्र 14 न्यूज : दरवर्षीप्रमाणे किर्लोस्कर ऑईल इंजिन्स मधील अधिकारी वर्ग व कामगार बंधू यांनी याही वर्षी विश्रांतवाडी ते आळंदी मोशी मार्गे देहू ही पायी वारी पूर्ण केली , साधारण 25 किलोमीटर चा हा टप्पा 5.30 तासात पूर्ण करतात . 1993 साली सुरू केलेली ही परंपरा अखंड चालू आहे व आजही सुमारे 40 ते 45 लोक यात हिरीरीने सहभागी होतात .
दर महिन्याच्या पहील्या रविवारी विश्रांतवाडी ते आळंदी हा साधारण 13 किलोमीटर प्रवास व वर्षांतून एकदा फेब्रुवारी महिन्यात विश्रांतवाडी आळंदी ते देहू असा टप्पा पूर्ण करतात . या दिवसाचे ओचित्य साधून कामगार क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा महाराष्ट्र शासना चा दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार श्री विकास शिवाजी कोरे किर्लीस्कर आईल इंजिन्स यांचा सत्कार कारखान्याचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर श्री आर आर देशपांडे , कानडेमामा , काकडे पांडुरंग , हणमंत बनकर व कामगार यांच्या हस्ते मॅगझिन चौक भोसरी येथे करण्यात आला .
2 Comments