महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.३० मार्च ) : दापोडी येथे जलसंपदा विभागाच्या वतीने दापोडी जलसंपदा प्रवेशद्वारावर कामगारांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.दापोडी येथील जलसंपदा विभाग व कामगारांचे स्थलांतर व बदल्या करण्याबाबत मुख्य अभियंता यांनी आदेश काढल्याने आदेश स्थगित करून दापोडी येथे सुरू असलेले काम पुर्ववत सुरू राहावे याबाबत कामगारांनी आंदोलन केले.
दापोडी येथील जलसंपदा विभागाचे स्थलांतर व बदल्या रायगड जिल्ह्यात करण्यात येण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश काढण्यात आल्याने कामगारांवर अन्याय होत असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.तर दापोडी व स्वारगेट येथून आजमितीस व्यवस्थित काम सुरू असूनही स्थलांतराचा घाट घातला जात आहे.तर सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बदल्या व स्थलांतरीत कुटुंब भरडली जाणारी असून १२० कर्मचा-यांच्या मागे एकुण सहाशे कुटुंब सदस्य संख्या असून या सर्वांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने हा आदेश रद्द करण्यात येवून दापोडी येथील जलसंपदा विभागाचे काम जैसे थे सुरू ठेवावे अशी कामगारांनी मागणी केली आहे.
यावेळी प्रकाश पाडाळे,रितेश गोर्डे,सतिश हिंगे,निलेश क्षिरसागर, गणेश वाडेकर,उदय पिंगट,संगिता स्वारी,सुप्रिया गायकवाड,किरण जयतकर ,निवृत्ती खांडवे,पुष्पा हरिश्चंद्रे,अंजना गोयर आदी उपस्थित होते.
9 Comments