महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. यावेळी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांपैकी ‘नवी दिल्ली’ जागा सर्वात जास्त चर्चेत आहे.
नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाची २७ वर्षांनी सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.
भाजपचे परवेश प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास १२०० मतांनी पराभव झाला आहे. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा समना करावा लागला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी त्यांचा १२०० मतांनी पराभव केला आहे. केजरीवालांसारख्या राष्ट्रीय नेत्याचा पराभव करुन परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले आहेत. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. याठिकाणी त्यांच्यासमोर भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दिक्षीत यांचे आव्हान होते.
अरविंद केजरीवाल यांना १० व्या फेरीपर्यंत एकूण २०,१९० मते मिळाली होती. तर प्रवेश वर्मा यांना २२,०३४ मते मिळाली होती. प्रवेश वर्मा हे अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा १८४४ मतांनी आघाडीवर होते. तर तिसऱ्या नंबरवर संदीप दीक्षित आले आहे त्यांना ३५०३ मते मिळाली आहेत. सुरुवाती पासूनच अरविंद केजरीवाल प्रवेश वर्मा यांच्या मागे होते
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…
हरित ऊर्जेकडे आणखी एक पाऊल; आधुनिक आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वाटचाल महापालिका मुख्यालयातील EV चार्जिंग…
महाराष्ट्र 24 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :-* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सह शहर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.14 ऑगस्ट : सोमेश्वर कारखान्याने २०२५-२६ या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी तब्बल…