Categories: Editor Choice

कष्टकऱ्यांचा आवाज हरपला ! … ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ डिसेंबर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी बाबा आढाव यांनी अखेरचा श्वास घेतला. कष्टकऱ्याचा आणि श्रमिकांचा आवाज ही त्यांची ओळख होती.

गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज (08 डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी झटणारा नेता हरपल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पुना रुग्णालयात 10 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबंधित समस्येमुळे बाबा आढाव यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते आणि त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. बाबा आढाव यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः रुग्णालयात त्यांच्या भेटीसाठी पोहचले होते. यावेळी शरद पवार यांनी वैद्यकीय पथकाकडून बाबा आढाव यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली, तसेच परिवाराशी देखील संवाद साधून त्यांना धीर दिला होता. मात्र आज बाबा आढाव यांचे निधन झाले.

1970 मध्ये बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. 95 वर्षीय असलेले बाबा आढाव तत्कालीन समाजवादी पक्षाचे होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून त्यांनी काम केले आहे. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाच्या माहिमेचे प्रणेते बाबा आढाव आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माथाडी कामगार नेते, सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे, सत्यशोधक म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुती निवडून आल्यानंतर विरोधकांनी ‘ईव्हीएम’चा मुद्दा लावून धरला होता. याच ‘ईव्हीएम’विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषणाला बसले होते. त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र बाबा आढाव हे आपल्या उपोषमावर ठाम होते. अखेर तिसऱ्या दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्यासोबत भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर बाबा आढाव यांनी आपले आत्मक्लेश उपोषण मागे घेतले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर … जून संपला; पावसाने मारली दांडी, पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न अधिक गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…

5 days ago

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक ‘सखाराम रेडेकर’ यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…

1 week ago

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

2 weeks ago

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…

3 weeks ago

कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…

3 weeks ago

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक! किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…

3 weeks ago