महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. यावेळी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांपैकी ‘नवी दिल्ली’ जागा सर्वात जास्त चर्चेत आहे.
नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाची २७ वर्षांनी सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.
भाजपचे परवेश प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास १२०० मतांनी पराभव झाला आहे. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा समना करावा लागला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी त्यांचा १२०० मतांनी पराभव केला आहे. केजरीवालांसारख्या राष्ट्रीय नेत्याचा पराभव करुन परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले आहेत. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. याठिकाणी त्यांच्यासमोर भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दिक्षीत यांचे आव्हान होते.
अरविंद केजरीवाल यांना १० व्या फेरीपर्यंत एकूण २०,१९० मते मिळाली होती. तर प्रवेश वर्मा यांना २२,०३४ मते मिळाली होती. प्रवेश वर्मा हे अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा १८४४ मतांनी आघाडीवर होते. तर तिसऱ्या नंबरवर संदीप दीक्षित आले आहे त्यांना ३५०३ मते मिळाली आहेत. सुरुवाती पासूनच अरविंद केजरीवाल प्रवेश वर्मा यांच्या मागे होते
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…
: आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० मे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम निकालात…