महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना भेडसावत असलेल्या पाण्याच्या कमी दाबाच्या समस्येचे अखेर समाधान करण्यात आले आहे. या भागात नवीन (कमी दाबाच्या) जलवाहिनीला जुन्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही समस्या अल्पावधीत मार्गी लागली असून, आता नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
या कामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…