महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०५ जानेवारी) : राज्य सरकारकडून नव्याने दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची घोषणा केली त्यातूनच राज्यभरातील दिव्यांग बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावी यासाठी अपाल संघटनेच्या अध्यक्षा मायाताई रणवरे व महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.
त्यात प्रामुख्याने दिव्यांगांना नोकर भरतीत विशेष सवलत,नव्याने प्रस्थापित दिव्यांग मंत्रालयात महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेच्या किमान ४ सदस्यांची नेमनुक करण्यात यावी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरी उपलब्ध करून देण्यात यावे व संजय गांधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम वाढवून मिळावी यासह अन्य मागणीचे पत्र खा.श्रीरंग आप्पा बारणे यांना देण्यात आले.
सदर प्रकरणी या सरकारकडून आत्तापर्यंत घेण्यात आलेले सर्व निर्णय लोकहिताचे व राज्यातील जनतेच्या भल्यासाठीच घेतले असून दिव्यांग व कुष्ठपिडिताच्या प्रश्न सोडविण्यासाठी देखील हे सरकार कटिबद्ध असून त्यासाठी मा.मुख्यमंत्री साहेबांची भेट घेत कुष्ठपिडितांच्या सर्व समस्या जातीने लक्ष घालून सोडविण्याचे आश्वासन दिले त्याप्रसंगी पिंपरी युवासेनाप्रमुख निलेश हाके,महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण सचिव अशोक आंबेकर व हर्षल जाधव व अपाल संस्थेच्या अध्यक्षा मायाताई रणवरे उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 29.जुलै.2026 : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान, संचलित द न्यू मिलेनियम…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…