महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिघी-बोपखेल प्रभागातील रखडलेल्या विकास कामांवर लक्ष देवुन आदेश देण्या बाबत निवेदन देत सामाजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुले यांनी तशी मागणी केली आहे.
२० वर्षे झाली बोपखेल गाव पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होवुन बोपखेल गावाची लोकसंख्या १८ हजार च्या आसं-पास आहे तरी अद्यापही बोपखेल गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत वाढती गुन्हेगारी लक्षात घेता बोपखेल रामनगर गणेशनगर भागात स्वतंत्र पोलिस चौकी व्हावी बोपखेल रामनगर गणेशनगर भागात एकही अधिकृत बॅक नाही सरकार दवखाना (ओ.पी.डी) पुरता न ठेवता सर्व सोयी युक्त अॅडमिट सुविधा उपलब्ध व्हावी ( वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी ) बोपखेल-खडकी जाणार्या पुल जलद गतीने काम पुर्ण करण्या बाबत सुचना द्यावी दिघी व विश्रांतवाडी वरुन बोपखेल गावात प्रवेश करताना एकच रस्ता आहे आशा वेळी तिथे अनेक अपघात घडतात आशा वेळी सिंग्नल ची मागणी वारंवार करुन टाळाटाळ करण्यात येत आहे
भाग्यदेव घुले म्हणाले, बोपखेल भागात खेळाचे मैदान स्विमिंग पुल हाॅकर्स जोन व्यायाम शाळा आशा मुलभुत गरजा पासुन नागरिकांनला वच्छित रहावं लागतं त्या वेळी मा.मुखमंत्री साहेबांनी विनंती केली की सरकार आल्या पासुन अनेक विकास कामे मार्गी लावली आहे तरी आपण आमच्या बोपखेल सारख्या छोट्या गावावर लक्ष द्यावे . त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश विरणक विनेश भोजे आमित टिळेकर दिनेश लोंढे रोहिदास जोशी दत्ता घुले दत्तात्रय घुले मारुती मोरे व बोपखेल गावातील नागरिक उपस्थित होते