महाराष्ट्र 14 न्यूज : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केलीये. या प्रकरणानंंतर भाजपने राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीयो शेअर केलाय. ते म्हणतात, “अर्णब गोस्वामी यांना केलेल्या अटकेचा आम्ही निषेध करतो. त्याचप्रमाणे ठाकरे सरकारचा पोलीस राज तसंच पत्रकार आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्टचा केला जाणारा छळ निंदनिय आहे.”
28 Comments