महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळात मुंबई पोलिसांनी झोन 12 च्या हद्दीत मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासह 312 जणांचा मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या मोबाईल चोरांना पकडण्यासाठी सर्कल 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरीचा मोबाईल शोधण्यासाठी आणि चोरट्यांसमवेत मोबाईल जप्त करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे.
अभिनेता भरत गणेशपुरे यांनी मोबाईल चोरल्याची तक्रार समतानगर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत झोन 12 डीसीपी डॉ. डी. स्वामी यांनी भारत गणेशपुरेसह 312 जणांचे चोरी गेलेले मोबाईल परत केले आहेत. भर पावसात, ट्रॅफिकमध्ये एका टोळीने महिन्याभरापूर्वी भारत गणेशपुरेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेला होता. त्याबाबत गणेशपुरेने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेला थरारक प्रसंग सांगितला होता. भर पावसात, ट्रॅफिक झालेली असताना एका टोळीने मदतीचं नाटक करत त्यांचा मोबाईल चोरला होता. त्यांनी आपले अनुभव सांगणारा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट केला होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मे ) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…