महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात ‘माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मला सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज भासणार आहे. १२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान अभियानाचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणामुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेले दोन दिवस विरोधी पक्षांनी समंजसपणे आणि सहकार्य करून अधिवेशन पार पाडण्यास मदत केली. राज्यातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो की, त्यांनी संकट काळात सरकारला पाठिंबा दिला. मार्च महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग महिन्यागणिक वाढेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला होता.
प्रत्येक जिल्ह्यात आपण कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारली आहे. मला राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय उभारायचे आहे. लोकांना यापुढे कोरोनाबरोबर जगायला शिकवले पाहिजे. देशात आपण सर्व प्रथम कोरोना नियंत्रणासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ‘माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी’ अभियान हाती घेतले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मला सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज भासणार आहे. १२ ऑक्टोंबर २४ ऑक्टोबर दरम्यान अभियानाचा दुसरा टप्पा पार पडेल, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…