महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 ऑगस्ट 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या *प्रभाग क्रमांक 31 – नवी सांगवी* परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, स्वच्छ भारत आणि स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या भागातील मुख्य रस्ते, सोसायटीच्या बाहेर आणि मोकळ्या जागांमध्ये नागरिकांकडूनच कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. यामध्ये शनी मारुती मंदिर , ढोरे फार्म, सिव्हिल हॉस्पिटल,लुम्बिनी बुद्ध विहार च्या समोर या भागात रस्त्यावर कडेला दररोज कचरा आढळून येतो . सकाळी आणि संध्याकाळी कचरा गाडी वेळेवर न आल्याने नागरिक कामावर असतात त्यामुळे रहिवासी पर्याय म्हणून रस्त्यावर कचरा टाकत आहेत.
महानगरपालिका आरोग्य विभागाकडून दररोज याठिकाणचा कचरा उचलला जातो, अनेक नागरिकांना दंड ही मारण्यात आला, अनेकांना समज देण्यात आली तरी ही नागरिक कॅरीबॅग मधून कामावर जातांना कचरा टाकताना दिसतात.
*स्थानिकांची व्यथा*
>आम्ही खरंच स्मार्ट सिटीत राहतो का?? “स्मार्ट सिटी म्हणतो पण इथे पाय ठेवायला जागा नाही. कचऱ्यामुळे डास, कुत्रे आणि घाणीचे साम्राज्य वाढले आहे. PCMC ने कचरा उचलण्याची वेळ निश्चित करावी.”
*▶️समस्या काय?*
1. *कचरा गाडीची अनियमित वेळ* – ठराविक वेळ नसल्याने कामावर जाणारे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात
2. नागरिकांमध्ये *जागरूकतेचा अभाव* – ओला-सुका कचरा वेगळा न करणे
3. *भटक्या कुत्र्यांचा प्रश्न* – कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली
*▶️PCMC कडे मागणी* :
नागरिकांनी PCMC आयुक्त आणि आरोग्य विभागाकडे तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:
. प्रभाग 31 मध्ये दररोज 2 वेळा कचरा उचलणी
. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
. स्वच्छता मोहीम आणि जनजागृती अभियान
*PCMC हेल्पलाइन*: http://1800-103-0222 | *स्वच्छता तक्रार App*: PCMC Sarathi
“स्मार्ट सिटी” फक्त नावापुरती न राहता, नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 ऑगस्ट : सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला असून यात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 29.जुलै.2026 : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान, संचलित द न्यू मिलेनियम…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…