Categories: Uncategorized

‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने … आज देहूत वारकरी बांधवांकरीता मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप … हजारो वारकऱ्यांनी घेतला या आरोग्य सेवेचा लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार झाली. देहू-आळंदीत राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखीने शनिवारी दुपारी अडीच वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

देहूत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असल्याने त्यासाठी देहू नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले आहे. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष आहे.

पिंपरी चिंचवड येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट -लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने वारकऱ्यांकरिता मोफत आरोग्य सेवा या वारी काळात पुरविण्यात येणार आहे, त्याचा प्रारंभ आज देहू येथून करण्यात आला.

पुणे ते पंढरपूर संपूर्ण पालखी महामार्गावर वारकरी बांधवांना चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट – लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने ही आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून हे सर्व डॉक्टर पुणे ते पंढरपूर पालखी मुक्कामी वारकऱ्यांना सर्व प्रकारची आरोग्य सेवा आणि औषधे संपूर्णपणे मोफत पुरवणार आहे.

आज देहू येथून पालखी प्रस्थानाकरिता आलेल्या हजारो वारकऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभघेतल्याचे यावेळी पहायला मिळाले. यात महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, मायमर मेडिकल कॉलेज – तळेगाव  चे डॉक्टर तसेच डॉ. देवीदास शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग होता, लाभ घेणाऱ्यामध्ये यात जेष्ठ वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यामध्ये वारकऱ्यांना सर्व प्रकारची औषधे ट्रस्टच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी ही आरोग्य सेवा पालखी काळात पुरवली जाते, वारकऱ्यांना पालखी मार्गात प्रवास करत असताना ऊन, वारा, पाऊस अशा अनेक अडचणींचा सामना करावा त्याकाळात ही चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टरांनी केलेली सेवा त्यांना वरदान ठरत असते.

 

Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

1 week ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

4 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

4 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

2 months ago