Categories: Editor Choice

Bhuvneshwer : शनि शिंगणापूरला एक कोटीचे दान देणाऱ्या आरोग्य मंत्र्याला पोलिसानेच घातल्या गोळ्या … कारमधून उतरताच हल्ला; प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथे नाबा यांच्यावर हा हल्ला झाला आहे.आज दुपारी एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असता ते कारमधून उतरताच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा खाली कोसळले. जखमी अवस्थेतच नाबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसाढवळ्या प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आरोग्यमंत्री नाबा दास हे झारसुगुडा येथील आमदार आहेत. आज दुपारी 12 वाजता ते मतदारसंघातील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी ब्रजराजनगरातील गांधी चौकात त्यांच्या छातीवर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.

एका पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या घातल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, गोळीबार का केला याची माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर नाबा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना एअरलिफ्टने भुवनेश्वरला नेण्यात येत आहे. या घटनेनंतर बीजेडी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला आहे.

नाबा यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट होता असं सांगितलं जातं. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. नाबा दास यांना केवळ पोलीस सुरक्षा देण्यात आली होती.

नाबा यांच्यावर ज्या पोलिसाने गोळीबार केला, त्याची ओळख पटली आहे. गोपाल दास असं या हल्लेखोराचं नाव आहे. गोपाल दास हा गांधी चौकात एएसआय म्हणून तैनात होता. गोपाल दासने नाबा यांच्यावर 4 ते 5 राऊंड गोळीबार केल्याचं सांगितलं जातं. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यात आलं आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

नाबा दास हे बीजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते आहेत. मागे ते महाराष्ट्रात आले होते. त्यांनी शनि शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयाहून अधिक किंमतीचे सोन्याचे कलश दान केले होते. त्यांनी शनि शिंगणापूर मंदिराला 1.7 किलो ग्रॅम सोने आणि 5 किलो चांदीचा कलश दान दिला होता.

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 week ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

2 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

4 weeks ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago