महाराष्ट्र 14 न्यूज : आपल्याला घर आणि दुकान रिकामं करण्याची सक्ती करणाऱ्या घरमालकाविरोधात भाडेकरूनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्या भाडेकरूला कुठलाही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. भाड्याचे थकलेले पैसे तातडीनं परत करावेत आणि जागा रिकामी करावी, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत.
एखादा भाडेकरू सलग अनेक वर्षं एखाद्या घरात राहिला, तरी तो त्या घराचा मालक होऊ शकत नाही. भाडेकरूंनी घर बळकावण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षं आपल्या जागेत राहणाऱ्या आणि जागा रिकामी करायला नकार देणाऱ्या देशभरातील अनेक घरमालकांना दिलासा मिळणार आहे.
आपल्याला घर आणि दुकान रिकामं करण्याची सक्ती करणाऱ्या घरमालकाविरोधात भाडेकरूनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्या भाडेकरूला कुठलाही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. भाड्याचे थकलेले पैसे तातडीनं परत करावेत आणि जागा रिकामी करावी, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत.
यापूर्वी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने या भाडेकरूला ९ लाख रुपयांचे थकित भाडे देण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात या भाडेकरूनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने भाडे देण्यासाठी वाढीव मुदत देण्यास नकार देत तातडीने भाड्याचे थकलेले ९ लाख रुपये घरमालकाला देण्याचे आदेश दिले आहेत.
🔴नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क : – 8999284895
भाडेकरू हा भाडेकरू असतो, घरमालक हा घरमालक असतो. भाडेकरू कितीही वर्ष त्या जागेत राहिला, तरी तो घरमालक होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. कनिष्ठ न्यायालयानं भाडेकरून दोन महिन्यांत जागा रिकामी करण्याचे आणि खटला नोंदवल्यापासून दरमहा जागा मालकाला ३५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश भाडेकरूनं पाळले नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्याला चांगलीच समज दिली*
16 Comments