Categories: Uncategorized

अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा सिंहाचा वाटा असेल : खासदार श्रीरंग बारणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ फेब्रुवारी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची शनिवारी थेरगावमध्ये बैठक झाली. त्यामध्ये खासदार बारणे यांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी करण्याची जनभावना निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांना मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा सिंहाचा वाटा असावा यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रचार सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव येथे शनिवारी बैठक झाली.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे, शहरप्रमुख निलेश तरस, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, शहर संघटक हेमचंद्र जावळे, उपशहरप्रमुख रविंद्र ब्रह्मे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, उपजिल्हासंघटिका शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा प्रमुख शैला निकम तसेच भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “अश्विनी लक्ष्मण जगताप या महायुतीच्या उमेदवार आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहे. त्याच्या जोरावर अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा पोटनिवडणुकीत विजय निश्चितपणे होणार आहे. मतदारसंघातील जनतेने त्यांना विजयी करून भरघोस मतांनी विधानसभेत पाठविण्याचा निर्धार पक्का केलेला आहे. त्यांना एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी विजयी करण्याची जनभावनाच निर्माण झालेली आहे. या जनभावनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेने आदर करायला हवा. अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सिंहाचा वाटा राहावा यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जोमाने प्रचार सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.”

Maharashtra14 News

Recent Posts

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

2 hours ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

9 hours ago

हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ता रुंदीकरणावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला … अजित दादा काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…

2 days ago

राखीच्या धाग्याने विणला ‘बहीण भावाच्या’ नात्याचा विश्वास’! पिंपळे गुरव येथे सौ पल्लवी जगताप यांच्या कडून अंध अनाथ कल्याण केंद्रात अनोखा रक्षाबंधन सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…

2 days ago

आमदार ‘शंकर जगताप’ यांनी आयोजित केलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात ७५३ तक्रारींचे निराकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…

3 days ago

पिंपळे गुरव येथील ‘ब्रिलियंट स्टार प्री स्कूल’ मध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…

3 days ago